कविता

तिला म्हणालो अग,कधी तरी स्वतः हुन ये. अलगद हळूवार नाजूक पावलांनी ये. मला नाही कसलीच घाई,तू ही निवांत ये,गोड तरल नाजूक शब्द सजवून ये. मी तुला नेहमीच उतरवतो,नजाकतीने अलवार.. मनातून हृदयातून तुला मांडतो, सजावतो, भुलवतो. एक एक शब्द तुझा मना…
कविता

तिला म्हणालो अग,कधी तरी स्वतः हुन ये. अलगद हळूवार नाजूक पावलांनी ये. मला नाही कसलीच घाई,तू ही निवांत ये,गोड तरल नाजूक शब्द सजवून ये. मी तुला नेहमीच उतरवतो,नजाकतीने अलवार.. मनातून हृदयातून तुला मांडतो, सजावतो, भुलवतो. एक एक शब्द तुझा मना…

राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला? सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला ? राधे, कुंतल रेशमी..सैरभैर गं कशाने? उधळले माधवाने किंवा नुसत्या वारयाने? कवी संदीप खरे . राधे तुला वेड हे कोणाचे लागले. ध्यानी मनी तो श्रीरंग,तन मन त्याच्यात भिजले …

तुझ्या माझ्या बेचिराख स्वप्नांच्या, आता पुन्हा मशाली पेटल्या. खिन्न मनाने,भग्न हृदयाच्या, आता पुन्हा गझल लिहिलया. शब्द तर जुनेच होते. भावना वणवा होऊन विझल्या. आता नाही रे लिहिली जाणार, कविता तुझ्या माझ्या प्रेमाची. भग्न मी, भग्न हृदयाच्या वाटा. अंगणात पडला जरी…

दुःखाचे ते तप्त उन्हाळे. सावल्या जरा तुझ्या प्रेमाच्या दे. नको विचारू तू हिशोब चटक्यांचा. शीतल सुखाचा गारवा दे. होता हा भ्रम कधी काळचा, तेच उन्हाळे परतून आले, तुझ्या सवे तुझ्या सावल्या, मावळून गेल्या सांग कसे. पुन्हा एकदा मी तप्त उन्हात, …

बऱ्याचदा अस होत, काहीच नाही सुचत शब्दांचे हवे ते रंग कवितेत माझ्या नाही उतरत पण साथ सोडत नाही मी, कधी माझ्या शब्दांची शब्द असतात माझे कधी, आभाळ भरून निळा, तर प्रेमात बुडालेला गुलाबी सृजनाचा रंग हिरवा, तर कधी सूर्यास्त केशरी …

उगाच टपोरे थेंब तुझे,अंगभर लेवू देवू नकोस.. हे पावसा असा तू उन्मत ,बेभान होऊ नकोस. चिंब भिजवून टाक या साऱ्या आसमंताला. माझ्या मनात मात्र तू गर्दी करू नकोस. हे पावसा उगा आठवन पुन्हा ती देवू नकोस. तू किती ही भिजवलेस…